Wednesday, 29 March 2017



दैनिक जनशक्ती या वृत्तपत्रात आजपासून दर बुधवारी 
'मन वढाय वढाय...' हा माझ्या स्तंभ सुरू झाला आहे, जरूर वाचा आणि कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.

माणसातील माणुसकी म्हणजेच अध्यात्म

-    
सुमेधा उपाध्ये

     
समाजाचेच एक अविभाज्य अंग म्हणजे अध्यात्म असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाहीत्याचं कारण म्हणजे माणसांच्या समुहाचा समाज बनतो तर त्या समुहातील विविध व्यक्तिरेखा या आपापल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच वावरत असतेव्यक्तीच्या हालचाली म्हणा किंवा त्यांची कर्म म्हणा ही त्यांच्यावरील संस्कारातून होत असतातहे संस्कार समाजाकडून होतात,घरातून होतातयाचवेळी ज्याच्या संपर्कात सतत येतो त्याचा वाण नाही पण गुण अंगी येतोचत्यामुळे समाजापासून ना राजकारण वेगळंना अर्थकारण वेगळंना अध्यात्म वेगळंएका समाजाचेच हे सर्व रंगमात्रमध्यंतरीच्या काळात अध्यात्माचा बागुलबुवा उभा करण्यात आलाशब्द पांडित्य वाढलं आणि सर्वसामान्य माणसं यापासून दुरावलीतसंच पैसा हे केंद्रबिंदू मानून सहज कष्ट न करता वेगवेगळ्या धर्माच्या नावाचा टिळा लावून म्हणायला संन्यासी पण प्रत्यक्षात पैसा मिळवण्याचा उद्देश ठेवून त्यांनी भाबड्यादेवभोळ्या मंडळींवर जाळं टाकलं आणि त्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू केलासमाजातही एक वर्ग होताच ज्याला कष्टाविना एका रात्रीत
श्रीमंतीचा राजमार्ग हवा होता,  गुप्तधनाचे प्रलोभन... यास अनेकजण बळी पडलेयामुळे कोणताही संबंध नसताना गालबोट लागले ते अध्यात्मालाच.  जीवन साधेपणानेसरळसोपे कसे जगता येईल आणि जे माझे आहेते दुस-याचेही आहेत्याचाही हक्क आहेयाची जाणीव करून देणारं, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारं अध्यात्म बाजूला पडलं.  जसा कॉम्प्यूटरमध्ये वायरस शिरतो तसाच या धार्मिक संस्कारातही शिरलाचउगाचच नको तेवढं बोजडपण वाढवलं गेलंनको तेवढं बाजारीकरण झालंत्यामुळं समाज यापासून दूर गेलामोठाले पांडित्य मांडणा-या ग्रंथांवर धुळ चढत गेली आणि आमच्या डोक्यातील जळमट वाढत गेली.
        जीवनात सर्वच अनुभव आपण स्वत:घेऊन शिकायचं म्हटलं  तर एक जन्म कमीच पडणारत्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेलम्हणूनच काही अनुभव पुस्तकातून घ्यावेतकाही दुस-याचं पाहून  शिकावं आणि आपल्याला स्वत:ला जगण्याच्या धडपडीत काही बरे बाईट अनुभव येत असतातचया महाराष्ट्राच्या भूमीत अध्यात्मिक अनुभवांचं गाठोडं खच्चून भरलेलं आहेया मातीतल्या संत मंडळींनी जे भरभरून ज्ञान दिलंयजी शिकवण दिलीय तिला तोड नाहीसामान्यातल्या समान्यजनांचं जगणं सुलभ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.देव माणसात शोधण्यास त्यांनी सांगितलंमात्रमध्यंतरीच्या भेसळीतूनच भेदाभेद आपण शुद्रबुद्धीने केलेस्वत:च्या रोजी रोटीचा विचार वाढलास्वार्थ बळावला आणि देवातही फुट पाडून त्यांना वाटून घेतलं आणि सुरू झाली तीदुकानदारी..हे चित्र केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादीत नाहीअवघ्या हिंदुस्तानात आहेपूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र अनुभव सारखेचमात्रअध्यात्मातील दाखले कोणत्याही धर्मातील ग्रंथांमध्येपुस्तकांमध्ये किंवा संतांच्या शिकवणुकीत पाहिले तर एक समान धागाच दिसतोयापैकी कोणीही एकमेकांचा द्वेष करण्यास सांगितलेलं नाहीएक धर्म वाढवण्यासाठी दुसरा धर्म बुडवण्याची शिकवण दिलेली नाहीजे काही सद्या समाजात विष दिसतंय ते आपल्यातीलच काहींच्या स्वार्थी कुबुद्धीच्या मंथनातून निर्माण झालेलं आहेसमुद्र मंथनातून विष आणि अमृत हे दोन्ही बाहेर आलंपण तेव्हा विष पचवणारा भोलेनाथ होताआता हे विष पचवणारा कुणीच नाही म्हणून ते विष पाझरतंय ते जिथं खोलवर पाझरलं जाईल तिथं तिथं विनाशसंहारअत्याचारहोतो ही भावनायावर जालीम उपाय काय तर माणसातील सदसद् विवेक बुद्दी जागृत होणं महत्त्वाचंत्यासाठी  सात्विक विचार आत अगदी तळापर्यंत रूजणं महत्त्वाचंआपण एखादी कृती विचारपूर्वक करतो...
या सदरा अंतर्गत आपण आता भेटत राहणारच आहोतभारतातील अनेक स्थळ आहेतजी आजही आपले दिव्यत्त्व राखून आहेतअनेक अद्भूत अनुभव तिथं जाणवतातअनेक महात्मे आहेतजे हजारो वर्षांच्या परंपरेचं जतन आणि संवर्धन करताहेतमानव कल्याण हाच त्यांचा हेतू आहेआजही माणुसकीचा ओलावा शिल्लक आहे, अत्यंत हलाखिच्या स्थितीत स्वतराहूनही आपल्या ताटतल्या अर्ध्या भाकरीतून पाव तुकडा भाकरी दुस-याला देताहेतठिकठिकाणी माणसातला माणूस जागृत करणारे साक्षात्कार होतात आणि तेव्हाच या भारत देशाचं वैविध्य आणि सांस्कृतिक अध्यात्मिक वैभव काय आहे याची जाणीव होतेगरज आहे ती केवळ व्यस्त जीवनातील काही काळ त्यांच्यात वावरण्याची!

No comments:

Post a Comment